आढावा राजदत्तांच्या चित्रपटांचा : त्यांच्याइतकी पारितोषिके आजपर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाला मिळालेली नाहीत. १९८२ ते १९८६ या सलग पाच वर्षांमध्ये दिग्दर्शनाची सात पारितोषिके मिळवण्याचा मोठा विक्रम त्यांच्या नावावर आहे

‘पाठलाग’चे चित्रीकरण सुरू असताना राजाभाऊंना आई खूपच आजारी असल्याचा निरोप आला. त्यांनी दत्ताजींना गाण्याचे कोणते प्रसंग कसे चित्रित करायचे ते सांगितले आणि ते पुण्याला निघून गेले. त्यांनी गाण्याचे प्रसंग चित्रित केले. ते पाहिले आणि त्यांनी दत्ताजींची पाठ थोपटली. संकलनाच्या वेळी वसंत साठे व एम. बी. सामंत हे दोघेही उपस्थित होते. त्यांनी तेथेच ‘माझा एक चित्रपट राजाभाऊ करणार आणि दुसरा दत्ता करणार’ असे जाहीर केले.......